Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

पिकअप विहिरीत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू

जून 15, 2026 1 Min Read

   पंढरपूर येथील भाविकांसाठी देवदर्शनाचा प्रवास दुर्दैवी ठरला. गोंदवले आणि म्हसवड येथे दर्शन करून परतत असताना त्यांना घेऊन जाणारे पिकअप माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जणांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले.

अधिकमासानिमित्त पंढरपूरमधील स्वामी विवेकानंदनगर परिसरातील काही भाविक सकाळी गोंदवले आणि म्हसवड येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून पंढरपूरकडे परतत होते. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास सातारा–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी हद्दीत वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने अपघातग्रस्तांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीने सात जणांना जीवदान मिळाले; मात्र आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये इंदूबाई दशरथ बावचे, पूजा अमोल सातोरे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, आरव अमोल सातोरे आणि सार्थक बालाजी बावचे यांचा समावेश आहे.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी आणि बचावलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन बिनविरोध

Next

तरुणीच्या आत्महत्येने साखरपा परिसरात हळहळ

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech