Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
⁠देशभरातील बातम्या

गृहिणींच्या श्रमांना न्यायालयाची दाद

जून 12, 2026 2 Min Read

घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणींच्या कष्टाचा सन्मान करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश आहेत. “गृहिणी या केवळ घर चालवत नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने ‘देश निर्माता’ आहेत,” असे गौरवद्गार न्यायालयाने काढले आहेत. रस्ते अपघातात एखाद्या गृहिणीचा मृत्यू झाल्यास, तिच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या विमा भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी तिचे काल्पनिक मासिक उत्पन्न आता किमान ३०,००० रुपये गृहीत धरले पाहिजे, असा आदेश कोर्टाने दिला आहे.
न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. आतापर्यंत कोर्टांमध्ये गृहिणींच्या कामाची तुलना ही ‘कुशल कामगारांच्या’ मजुरीशी केली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही जुनी पद्धत पूर्णपणे फेटाळून लावली. गृहिणी दिवसभर घरात जे प्रेम, काळजी आणि कष्ट देतात, त्याचे मूल्य केवळ बाजारातील मजुरीच्या दराने ठरवले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हा निर्णय पंजाबमधील एका जुन्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आला. नोव्हेंबर २००१ मध्ये रेश्मा नावाच्या एका महिलेचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.
तिच्या पतीने आणि तीन मुलांनी नुकसानभरपाईसाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, हे प्रकरण तब्बल २३ वर्षे न्यायालयात रखडले. शेवटी डिसेंबर २०२४ मध्ये हायकोर्टाने यावर निर्णय दिला आणि आता २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. एका कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ वाट पाहावी लागली, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.
या ऐतिहासिक निर्णयामुळे आता रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या गृहिणींच्या कुटुंबांना मिळणाऱ्या विमा भरपाईच्या रकमेत लक्षणीय वाढ होणार आहे. गृहिणींच्या न दिसणाऱ्या, विनामोबदला केलेल्या कामाला पहिल्यांदाच अशा प्रकारे थेट आर्थिक मूल्य किमान ३०,००० रुपये प्रति महिना देण्यात आले आहे.
हा निर्णय केवळ विम्याच्या पैशांपुरता मर्यादित नसून, देशातील कोट्यवधी महिलांच्या घरगुती कष्टाला आणि त्यांच्या अस्तित्वाला समाजात मानाचे स्थान देणारा ठरला आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

रत्नागिरीत ‘मरीन होमगार्ड’ प्रशिक्षण

Next

गाईला वाचवताना एसटीची झाडाला धडक; मोठी दुर्घटना टळली

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech