Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

शिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जुलै 13, 2026 2 Min Read

    रत्नागिरी : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

     जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) आणि आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२५ व २०२५-२६) चा दिमाखदार वितरण सोहळा आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याला भारतरत्न पा. वा. काणे आणि सानेगुरुजींसारख्या महान विभूतींचा वारसा लाभला आहे. सानेगुरुजींच्या आईने दिलेला ‘ह्रदयाला आणि मनाला मळ लागणार नाही’ हा विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना प्रत्यक्ष राबवला पाहिजे. शिक्षकांनी संघर्षापेक्षा संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातही ‘दामले विद्यालया’सारख्या दर्जेदार शाळा निर्माण व्हाव्यात आणि पुढील वर्षी जिल्ह्यातील किमान ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतील, हे उद्दिष्ट शिक्षकांनी प्रामाणिकपणे पूर्ण करावे.

‘शिव्यामुक्त’ आणि ‘नशामुक्त’ शाळेचे आवाहन

अस्मिता केंद्रे (अध्यक्ष, जि.प.): शासकीय कामकाजासोबतच मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याचे शिक्षकांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या विशेषतः पदोन्नती देण्यापासून मी कामकाजाला सुरुवात केली.

     वैदेही रानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी): जिल्ह्यातील १००% शाळा ‘निपुण शाळा’ घोषित करण्याचे आपले ध्येय आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि त्यांच्यात चांगल्या वर्तनाची सवय लावण्यासाठी आता ‘शिव्यामुक्त शाळा’ आणि ‘नशामुक्त शाळा’ हे मिशन हाती घेण्याची गरज आहे. तसेच, पटसंख्येअभावी एकही शाळा बंद पडणार नाही, याची काळजी शिक्षकांनी घ्यावी, असे पालकमंत्री म्हणाले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ३ महिला वारकरी ठार, २० जखमी

Next

मंत्री ॲड. आशिष शेलार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech