

राज्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. विदर्भातील शाळा आता २२ जूनपासून सुरू होणार असून उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील.
विदर्भात सध्या कडक ऊन आणि उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी विदर्भातील सर्व शाळा १ जुलैपर्यंत सकाळच्या सत्रातच भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला असून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.






