Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांचा ओघ
गणेशोत्सवात अ‍ॅक्वा लाइन मध्यरात्रीपर्यंत सुरू; शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता
परिसरातील चालू घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षणात रत्नागिरी अव्वल; १००% डिजिटलायझेशन पूर्ण

सप्टेंबर 3, 2026 1 Min Read

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रोल मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू करत मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेतला. खेड तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले.

जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणासोबत डिजिटल कामगिरीतही उल्लेखनीय प्रगती झाली असून, महाराष्ट्रात १०० टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरल्याचे अगरवाल यांनी सांगितले. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून हरकती आणि सूचना नोंदविण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील एएसडी (गैरहजर, स्थलांतरित, मयत) मतदारांचे प्रमाण ९.९ टक्के असून सुमारे १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची पडताळणी सुरू आहे. प्रशासनाने सर्व तहसील, उपविभागीय कार्यालये, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे, तसेच नाव नसल्यास फॉर्म ६ आणि दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून प्रवास आणि सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

गणेशोत्सवात भाविकांची लूट खपवून घेणार नाही; अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा

Next

करबुडे हायवे परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड; दोन आरोपी ताब्यात

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech